शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

मरण्यापूर्वी तरी ठेवींचे पैसे द्या! ‘भुदरगड’च्या ठेवीदारांची मागणी : दहा वर्षांत केवळ २५ हजार ठेवीदारांचे पैसे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:32 IST

कोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांची अवस्था केविलवाणी झाली असून, दहा वर्षांत जेमतेम २५ हजार ठेवीदारांचे पैसे अवसायकांना देता आले आहेत.

ठळक मुद्दे१ लाख ७३ हजार ठेवीदारांचे १२६ कोटी रुपये देणे होते, तर १८४ कोटी थकीत कर्जे होती.अजून दीड लाख ठेवीदारांचे १०५ कोटी रुपये देणे

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांची अवस्था केविलवाणी झाली असून, दहा वर्षांत जेमतेम २५ हजार ठेवीदारांचे पैसे अवसायकांना देता आले आहेत. अद्याप दीड लाख ठेवीदार आपल्या आयुष्याची पुंजी परत मिळविण्यासाठी धडपडत आहेत.

उतरत्या वयात औषध-पाण्यासाठी पैसे नसल्याने या ठेवीदारांची आबाळ झाली असून किमान मरण येण्यापूर्वी तरी आमचे पैसे मिळणार का? असा उद्विग्न सवाल या पतसंस्थेचे ठेवीदार करीत आहेत.‘भुदरगड’ पतसंस्थेच्या ५२ शाखांच्या माध्यमातून हजारो गोरगरीब कुटुंबाचे संसार उभे राहिले; पण संचालक मंडळाच्या गैरव्यवस्थापनामुळे पतसंस्था आतबट्ट्यात आली आणि फेबु्वारी २००७ मध्ये अवसायक आले; पण सन २००२ पासूनच संस्थेला कीड लागण्यास सुरुवात झाल्याने काही ठेवीदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अवसायक आले त्यावेळी १ लाख ७३ हजार ठेवीदारांचे १२६ कोटी रुपये देणे होते, तर १८४ कोटी थकीत कर्जे होती.

सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार संस्थेचे कामकाज सुरू आहे. संस्थेने स्वभांडवलातून दहा हजार रुपयांपर्यंत, तर शासनाच्या पॅकेजमधून वीस हजार रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांना पैसे देण्यास सुरुवात केली आहे; पण गेल्या दहा वर्षांत केवळ २५ हजार ठेवीदारांनाच पैसे देता आले. अजून दीड लाख ठेवीदारांचे १०५ कोटी रुपये देणे असून, १५६ कोटी कर्जाची वसुली होणे आहे.पतसंस्थेच्या १७ मालमत्ता असून त्याची किंमत ३० कोटी आहे. त्याचबरोबर कर्जदारांच्या तारण मालमत्ता साडेचारशेपर्यंत आहेत; पण या मालमत्तांची विक्रीच होत नसल्याने वसुली थंडावली आहे.

‘सहकार पंढरी’ असणाºया कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत अनेक पतसंस्थांनी आपला गाशा गुंडाळल्याने सामान्य माणसाला ठेवीच्या रूपाने गळफास लागला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विचार करायचा झाल्यास ‘भुदरगड’, ‘तपोवन’, ‘मानिनी’ या पतसंस्थांमध्ये लाखो ठेवीदार अडकले आहेत. सध्या या संस्थांवर अवसायक असून ‘कर्जाची वसुली होईना आणि ठेवी परत जाईना,’ अशी अवस्था पाहावयास मिळत आहे, त्यानिमित्त या संस्थांचा घेतलेला आढावा......एकत्र ठेवींचा फटकाएकाच व्यक्तीने वेगवेगळ्या चार-पाच ठेवपावत्यांच्या माध्यमातून पतसंस्थेत पैसे ठेवले होते. या पावत्यांची रक्कम दहा अथवा वीस हजारांपेक्षा कमी असली तरी चार पावत्यांची एकत्रित रक्कम केल्याने ही रक्कम वीस हजारांपेक्षा जास्त होते. त्यामुळे संबंधित ठेवीदाराला लाभ घेता येत नाही. 

ठेवींपेक्षा खर्चच अधिक‘भुदरगड’चे ठेवीदार हे भाजीपाला विक्रेते, चहाटपरीवाले असे सामान्य वर्गातील असल्याने ठेवींची रक्कम फारच कमी आहे. त्यात ठेवीदाराचे खाते नसेल तर पाचशे रुपये भरून खाते उघडावे लागते, ठेवीदार मृत असला तर त्याच्या वारसांचे शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. पाचशेच्या ठेवींसाठी सातशे रुपये खर्च होत असल्याने प्रतिसाद मिळत नाही.अवसायकांना पाच वर्षांची मुदतवाढसहकार कायद्यानुसार एखाद्या संस्थेचा अवसायक कालावधी दहा वर्र्षांपेक्षा जास्त असत नाही; पण ठेवीदारांचे हित लक्षात घेता सहकार ‘कलम १५७’ प्रमाणे अवसायक मुदतवाढीचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे पाठविला असून, त्याला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :MONEYपैसाkolhapurकोल्हापूरbankबँक